पोचीराम कांबळेंच्या हौतात्म्याचे काय?औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, यासाठी झालेल्या नामांतर लढ्यात काही मातंग समाजातील आंबेडकरवादी युवकांचा, तरुणांचा सक्रीय सहभाग होता. त्यात पोचीराम कांबळेने हौतात्म्य पत्करले. पोचीराम कांबळेच्या हौतात्म्याची म्हणावी तशी नोंद महारांनी घेतलीच नाही. केवळ तो मातंग असल्याकारणाने आणि महारांत मातंगाप्रती पूर्वग्रहदूषितपणा असल्यानेच पोचीराम कांबळेंच्या हौतात्म्यानंतरही त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा महारांनी सन्मान केला नाही.
जर हा पोचीराम कांबळे महार, बौध्द असता तर त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून गावोगावच्या महारवाड्यात बाबासाहेबांच्या बाजूला त्याचे छायाचित्र झळकले असते. अनेक महारवाड्याच्या प्रवेशद्वाराला पोचीराम कांबळेचे नाव मिळाले असते. अनेक महारांच्या, बौध्दांच्या नव्या वस्त्यांना पोचीराम कांबळेनगर असे नाव मिळाले असते. मात्र पोचीराम कांबळेचे दुर्दैव असे की, तो मातंग समाजात जन्माला आला होता. मात्र अस्सल आंबेडकरवादी विचाराने झपाटलेला होता, म्हणूनच त्यांनी नामांतर लढ्यात उडी घेतली आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. याचे किती महार मंडळी प्रामाणिक स्मरण करून त्याला अभिवादन करतात, हाही महत्त्वाचा आणि संशोधनाचाच भाग आहे.
केवळ बौध्द-मातंग भेदनीतितून पोचीराम कांबळेंच्या नामांतर लढ्यातील हौतात्म्याचा सन्मान केला जात नाही, तर ही भेदनीति नाही का? याला मातंग समाजात जन्माला आलेला पोचीराम कांबळे कारणीभूत आहे का? तरीही आम्ही भेदनीतिला अगदी घट्टपणे गत शेकडो वर्षांपासून आवळून बसलो आहोत. हीच बाबासाहेबांची नीति होती का? हाच बुध्दाच्या समतेचा धर्म होता का? जाती-जातीत तेढ आणि भेद निर्माण करणारे संकुचित वागणेच आम्ही सोडायला तयार नाही.
आज शहीद पोचीराम कांबळेचा "शहीद दिवस" आहे. त्या निमित्ताने या "धगधगत्या प्रेरणेला" मानाचा जय भीम व,नीळा सलाम !!🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐
जर हा पोचीराम कांबळे महार, बौध्द असता तर त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून गावोगावच्या महारवाड्यात बाबासाहेबांच्या बाजूला त्याचे छायाचित्र झळकले असते. अनेक महारवाड्याच्या प्रवेशद्वाराला पोचीराम कांबळेचे नाव मिळाले असते. अनेक महारांच्या, बौध्दांच्या नव्या वस्त्यांना पोचीराम कांबळेनगर असे नाव मिळाले असते. मात्र पोचीराम कांबळेचे दुर्दैव असे की, तो मातंग समाजात जन्माला आला होता. मात्र अस्सल आंबेडकरवादी विचाराने झपाटलेला होता, म्हणूनच त्यांनी नामांतर लढ्यात उडी घेतली आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. याचे किती महार मंडळी प्रामाणिक स्मरण करून त्याला अभिवादन करतात, हाही महत्त्वाचा आणि संशोधनाचाच भाग आहे.
केवळ बौध्द-मातंग भेदनीतितून पोचीराम कांबळेंच्या नामांतर लढ्यातील हौतात्म्याचा सन्मान केला जात नाही, तर ही भेदनीति नाही का? याला मातंग समाजात जन्माला आलेला पोचीराम कांबळे कारणीभूत आहे का? तरीही आम्ही भेदनीतिला अगदी घट्टपणे गत शेकडो वर्षांपासून आवळून बसलो आहोत. हीच बाबासाहेबांची नीति होती का? हाच बुध्दाच्या समतेचा धर्म होता का? जाती-जातीत तेढ आणि भेद निर्माण करणारे संकुचित वागणेच आम्ही सोडायला तयार नाही.
आज शहीद पोचीराम कांबळेचा "शहीद दिवस" आहे. त्या निमित्ताने या "धगधगत्या प्रेरणेला" मानाचा जय भीम व,नीळा सलाम !!🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment